Friday, 1 August 2025

तुका म्हणे ....

माझं हे नवीन ब्लॉग आहे. जे भारतातातील थोर संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच अर्थ लिहिण्याचे प्रयत्न करत आहे जर काही चूक झाली तर क्षमा असावी.   

।।१।।


समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥
आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥
ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों देसी ॥२॥
तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३



अर्थ 

          मन हे खूप अस्थीर असतो त्याच मानाला एकाग्र करण्या साठी, पांडुरंगाचे चरण विटेवरी आहेत त्या चरणावर सामान नजर ठेऊन, त्याच चरणावर माझं मन स्थिर राहूदे. मनाला स्थिर ठेव भगवंता. 

         भौतिक पदार्थाची गरज भासू देऊ नकोस, भौतिक पदार्था मुळे लोभ निर्मण होतो व त्या लोभास  बळी ना पडता  माझी एवढीच आकांक्षा आहे ते पूर्ण कर. 

        ब्रह्मादिक म्हणजे मोठे पद मला देऊ नकोस, कारण त्या पदामुळे खुप दुःख व त्रास भोगावा लागतो, अर्थात  मोठ्या पदामुळे वाईट विचार मानत  येतात, त्या मुळॆ मानतील एकाग्रता भंग होते. त्याच मुळे  ध्यान भंग होतॊ. 

       संत तुकाराम महाराज म्हणतात कि आम्हाला माहित आहे उच्च पदामुळे काय होते ते. आपण जे कर्म आणि आपलं भक्ती मार्ग असलेलं धर्म नाश पावतो. 

************************************************************************************************************************************

No comments:

Post a Comment

तुका म्हणे ...।।३।।

।।३।। सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥ गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥ विठो माउलिये ह...